ग्रामरक्षण
गावाच्या सुरक्षेसाठी राबवले जाणारे उपाययोजना व स्थानिक पातळीवरील दक्षता. यात आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक शिस्त व ग्रामसुरक्षा समितींच्या माध्यमातून गाव सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
- महात्मा गांधी तंटामुक्त शांतता पुरस्कार प्राप्त
- अवैध धंद्यांना बंदी साठी समिती स्थापन करून अवैध धंदे कायमचे बंदी साठी ग्रामपंचायतीने ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. दारू बंदी, जुगार बंदी, स्टिंग बंदी.
- महिलाच्या सुरक्षेतेसाठी विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामध्ये मुलींना स्वरक्षणासाठी कराटे क्लासेस आयोजित करण्यात आले आहेत.
- ग्रामरक्षक दलाची स्थापना करण्यात आली आहे.
- तंटामुक्त समिती मार्फत गावातील तंटा १००% सोडवला जातो.
- संपूर्ण चिंचणी (वांगी) गाव सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी. व्दारे नियंत्रीत केले आहे.
- बालकांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरामध्ये संरक्षण भिंती बांधकाम केले आहे. शाळेच्या १०० मीटर यार्डत तंबाखू मुक्त केले आहे.





